Thursday, 14 April 2016

अणेंचा महाराष्ट्रद्रोह!

अणेंचा महाराष्ट्रद्रोह!



विदर्भाच्या मुद्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा देणारे अधिवक्ता श्रीहरी अणे यांनी बुधवारी नागपुरात स्वतःचा वाढदिवस साजरा करतांना महाराष्ट्राचा नकाशा असलेला केक कापून त्यातून विदर्भ आणि मराठवाडा वेगळे करीत असल्याचे दाखवून दिले. दरम्यान त्यांच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना मनसेप्रमुख राज ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे अणेंना इशारा दिला आहे. अधिवक्ता अणे सध्या विदर्भाच्या दौर्‍यावर असून वेगवेगळ्या जिल्ह्यांत जाहीर सभा घेत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ता मा.गो. वैद्य यांच्या विदर्भवादी भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका केली होती. महाराष्ट्राचे चार भागही होऊ शकतात, अशी भूमिका वैद्य यांनी मांडली होती. त्यावर महाराष्ट्र म्हणजे वाढदिवसाचा केक नाही, या शब्दांत राज ठाकरे यांनी वैद्य यांच्या भूमिकेचा समाचार घेतला होता. तसेच अणेंवरही टीका केली होती. या पार्श्‍वभूमीवर अणे यांनी नागपुरातील रविभवनात कुटुंबीय तसेच सहकार्‍यांसमवेत वाढदिवसाचा केक कापला. त्यावर महाराष्ट्रातील वेगवेगळे प्रदेश दर्शवण्यात आले होते. महाराष्ट्राच्या आकाराच्या केकमधून त्यांनी विदर्भ व मराठवाडा वेगळे करीत राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. वाढदिवसाचा हा कौटुंबिक कार्यक्रम होता. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नका, असे अणे यांनी स्पष्ट केले. मात्र केकच्या माध्यमातून राज्याचे दोन तुकडे करणारे राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हा वाढदिवस आयुष्यभर लक्षात ठेवतील, असा धमकीवजा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
या सर्व घटनाक्रमातून श्रीहरी अणे यांच्यातील महाराष्ट्रद्वेष विकृत स्वरूप धारण करत असल्याचे दिसत आहे. तसेच वेगळ्या विदर्भासाठी ते सध्या नागपुरात ङ्गिरून जनमत निर्माण करत आहेत. त्यांच्या या कृतीला हिंसक विचाराची जोड प्राप्त होऊ लागली आहे काय, अशीही शंका अणे यांच्या महाराष्ट्राच्या नकाशाच्या आकाराचा केक त्रिभाजन करून कापण्याच्या कृतीवरून येते. यदा कदाचित येणार्‍या काही दिवसांत अणे वेगळ्या विदर्भाच्या चळवळीचे नेतृत्त्व करतांना त्या भागात रक्ताचा सडा पहायला लावतील, अशीही दाट शक्यता यावरून निर्माण होते. हे अतिशयोक्तीपणाचे वाटत नाही; कारण अणे यांच्या हातून तसे संकेत देणारे कृत्य घडले आहे. विदर्भाचा विकास होत नाही, यामुळे संताप असणे गैर नाही, मात्र म्हणून त्या संतापाचे रूपांतर अशा विध्वंसक स्वरूपाच्या कृतीतून प्रदर्शित करावे, हे अशोभनीय आहे. हा थेट महाराष्ट्राचा द्रोह म्हणावा लागेल. अणे यांना विदर्भाचा विकास होत नाही, म्हणून अवघ्या महाराष्ट्राची घृणा वाटू लागली आहे. सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विदर्भाचा तरुण आहे. अर्थमंत्री पदही विदर्भाकडेच आहे आणि केंद्रातही विदर्भातील नितिन गडकरी यांचे चांगलेच वजन आहे. त्यामुळे विदर्भाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ही ङ्गौज नक्कीच प्रयत्न करत आहे, त्यासाठी प्रतिक्षा करण्याची गरज आहे; परंतु अणे यांना खरोखरीच विदर्भाचा विकास व्हावा, असे वाटत असते, तर त्यांनी प्रतिक्षा केली असती; मात्र तसे दिसत नाही, अणे यांना विदर्भाच्या नावाने राजकारण करायचे आहे. या संदर्भात भाजपची सुस्पष्ट भूमिका नसणे, यामुळे तर अणेंच्या प्रत्येक कृतीमागे असंख्य तर्कवितर्क निघत आहेत. खरेतर अणे या विषयावर राज्यशासनाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी आता राज्यातील जनतेमधील संभ्रम दूर करण्याची वेळ आली आहे; कारण अजूनही महाराष्ट्र अखंड असतांना एक अधिवक्ता वेळोवेळी आणि जागोजागी राज्याच्या विभाजनाचे विचार मांडत आहे आणि त्याचे पडसाद समाजमनावर उमटत आहेत, तर मग राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांनी या संदर्भात कारवाई करणे अपेक्षित आहे.  परंतु मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांच्यासह भाजपचे नेतेमंडळींचे मौन बरेच काही व्यक्त करत आहे. कारण तसे नसते, तर एकतर मुख्यमंत्री ङ्गडणवीस यांनी महाराष्ट्राप्रती अभिमान जागृत ठेवून अणे यांच्यावर गुन्हाच दाखल केला असता अथवा समाजात दुही माजविणारे विचार प्रदर्शित करत असल्याकारणाने त्यांच्यावर कायद्याने या विशिष्ट विषयापुरते विचारस्वातंत्र्यावर मर्यादा आणली असती; मात्र सत्ताधारी पक्षापैकी भाजपकडून अणे यांच्या या स्वैराचारावर अवाक्षर काढले जात नाही. सध्या राज्यात विविध समस्यांनी डोके वर काढले आहे. दुष्काळ, बेरोजगारी, जात्यंधता, धर्मांधता यामुळे निर्माण होणारे तणावग्रस्त वातावरण यामुळे राज्याच्या समाजकारण आणि राजकारणाची घडी विस्कटलेली असतांना त्यात भरीसभर म्हणून राज्याच्या ङ्गाळणीचे विचार पसरवून समाजात विध्वंसकप्रवृत्ती पसरवणार्‍या श्रीहरी अणे नावाच्या नव्या संकटाला प्र्रोत्सााहन देणे राज्याच्या विकासाच्या वाटेत धोंडा निर्माण करण्यासारखे आहे. - नित्यानंद भिसे, १४.०३.२०१६ 

No comments:

Post a Comment